Posts

Showing posts from 2010

बदल

गेले काही दिवस मी मुंबईत राहतेय. होस्टेल life नंतर बऱ्याच काळाने एका residential colony  मध्ये आलेय. आणि आश्चर्य म्हणजे एका  बोलक्या, जिवंत कॉलोनी त! जिवंत अशासाठी म्हटलं कारण एकमेकांशी संवाद साधणारे लोक, मिळून मिसळून काही कार्यक्रम करणाऱ्या बायका, (ते सुद्धा त्यातल्या आनंद साठी, दिखावा म्हणून नव्हे!) संध्याकाळचे ५ वाजले रे वाजले कि  बाहेर लहान मुलांचे खेळ, ९ वाजेपर्यंत न संपणारा दंगा, आणि खेळ संपल्यावर कोणतीही  random बेल वाजवून हक्काने प्यायला पाणी मागणारी मुले - या सगळ्या गोष्टी ज्या मला कुठेतरी हरवून गेल्यासारख्या वाटत  होत्या , त्या इथे 'जिवंत' दिसल्या! मलाही माझ्या गावाची आठवण आली.. आणि एकदम "पूर्वी माझा  गाव हि  असा  असायचा " असा विचार आला. आणि दुसऱ्याच क्षणी त्यातला "पूर्वी" हा शब्द अक्षरशः  बोचला!  म्हणूनच हे काहीतरी सुचतंय. आपण मोठे होतो, तसा नव नवीन गोष्टीतला आनंद अनुभवतो. आणि तो आनंद अजून नवीन गोष्टीतला आनंद  discover करायला आपल्याला प्रवृत्त करतो. खरं आहे!  multiplex मधे  dolby sound  आणि  3d effects  सह फिल्म बघणे,  TV  वरच्या मालिका, गाडी
वाट कठीण वळणांची असली तरीही मन चालत राहत, आठवणीत जातं , कधी मागे वळून पहात शोध आडोशाचा नसतो, पाहिजे असतो दिलासा गर्द छायेचीच अपेक्षा नाही, गार वारा हि असे पुरेसा. अशाही वेळी कधीतरी असं वळण वाट घेते, वारा व सावलीच काय प्रेमाची खाण समोर येते! न सांगता, न मागता खूप काही मिळून जातं वाटेवरच्या समाधानात थकलेलं मन मनसोक्त न्हात. चिंब मनाला एवढ्यात पुढल्या वाटेचं भान येतं, वाट कठीण वळणांची  दिसते, तरीही मन चालत रहातं...